एक वैतागलेला औरंगाबादकर



कधी काळी आशिया खंडातील सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहर आज निष्क्रिय नेत्यांमुळे आणि प्रशासनामुळे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये दिसत आहे.

आज माझ्या औरंगाबाद शहराची ओळख धुळीने माखलेल शहर, खड्ड्यांच शहर, कचऱ्याने ग्रासलेल शहर, दंगलीमुळे वादग्रस्त झालेल शहर, अशा इत्यादी नकारात्मक गोष्टीमूळे नेहमी वादात राहणार शहर म्हणून ओळखला जात आहे.

जे शहर भौगोलिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. ज्या शहरांमध्ये उद्योजकतेसाठी आणि प्रगतीसाठी खूप जास्त वाव आहे. जेथे अत्यंत प्राचीन अशा ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्राचीन वास्तु आहेत. जे शहर निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेलं आहे. ज्या शहराला पाण्यासाठी प्रचंड मोठे जयकवाडी धरण आहे. तसं पाहिलं तर या माझ्या शहराला भौगोलिक दृष्ट्या कोणतेही नैसर्गिक हानी नाही.

या माझ्या शहराला अत्यंत मेहनती खेळाडू, कलावंत, लेखक, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्चर, इत्यादी क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणारे  असे बहुगुणी नागरिक लाभलेले आहेत. जे या शहराचे नाव मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पण अशा बहुगुणी नागरिकांना त्यांच्या दर्ज्याप्रमाने येथे पाठिंबा आणि  वाव दिलेला दिसून येत नाही.

या माझ्या शहराला अनेक वर्षांपासून काही मिळालेला असेल तर फक्त ते आश्वासने, मोठ्या मोठ्या थापा, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, बेरोजगारी, रस्त्यांवर लावलेले मोठे मोठे जाहिराती, भाऊ दादा भाईंचे जागोजागी लावलेले बॅनर, जागोजागी जमा होणारा कचरा, अशांततेचे वातावरण, दूषित हवा आणि या सर्वांपेक्षा सर्वात हानिकारक असणारी गोष्ट म्हणजे येथे असलेले अत्यंत भयानक खड्डेयुक्त रस्ते. या रस्त्यापेक्षा खेडेगावातील पाऊलवाट बरी, ती सुद्धा या शहरातील रस्त्यापेक्षा चांगल्या अवस्थेत आहेत.

आज माझ्या शहरामध्ये असा एकही रस्ता राहिलेला नाही ज्या रस्त्यामध्ये कमीत कमी पन्नास ते शंभर खड्डे नाहीत आणि त्यांचे स्वरूप साधेसुधे नसून अत्यंत भयानक आहे. काही ठिकाणी तर हद्दच झाली एक फूट खोल खड्डे. आम्ही गाडी चालवावी की उडवत न्यावी समजत नाही. ही परिस्थिती संपूर्ण औरंगाबादची आहे.

या अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या खड्ड्यामूळे औरंगाबाद शहरातील शेकडो नागरिक दररोज अपघाताला सामोरे जात आहेत. अनेक नागरिकांना दुखापत होत आहे. कोणाच्या मानेला, कोणाच्या कमरेला,  कोणाच्या पाठीला कोणाच्या मणक्याला, कोणाच्या गुडघ्याला गंभीर स्वरूपाची इजा होत आहेत. त्यामुळे होणारा मनस्ताप आणि वैताग वेगळाच. आज संपूर्ण शहरातील असा एकही व्यक्ती नाही ही जो या अत्यंत दयनीय परिस्थिती असलेल्या रस्त्यामुळे वैतागलेला नाही किंवा परेशान झालेला नाही.

पण या माझ्या शहरातील लोकांना किती सहिष्णू आणि सहनशील म्हणावे लागेल की,  ते सर्व आशा परिस्थितीविरोधात एकही शब्द बोलत नाहीत. या बद्दल जाब विचारत नाहीत. या बाबत आंदोलन करत नाही. या बद्दल तक्रार करत नाही.

मग या नागरिकांना सुजाण नागरिक म्हणावे की लाचार नागरिक? हा प्रश्न पडतो.

या नव्याने निवडून आलेल्या नेत्यांकडून या औरंगाबादकराची एक माफक अपेक्षा आहे की गेली कित्येक वर्षापासून वाईट परिस्थितीत असलेल्या या जीवघेण्या रस्त्यांना तातडीचे काम समजून लवकरात लवकर चार, सहा महिन्यात चांगल्या दर्जाचे काम करणारे कंत्राटदार लावून व्यवस्थित बनवावे. हा औरंगाबादकर फक्त पोकळ आश्वासनांनी आता कदरलेला आहे.

- रोहन श्रीरामवार, ३१.१०.२०१९

Comments

  1. हा लेख आज च्या औरगबाद रसत्याची खरी वास्तविक पारिस्थिती दर्शवितो , आज खडयामुळे पाठदुखी व वाहनाचे Maintenance वाढाले and Mileage कमी झाले आई . सदरील लेख हा सुंदर लिहला आहे. लेख शेर केल्याबध्दल धन्यवाद

    ReplyDelete
  2. Very very nice noting in Aurangabad rods proble🌺👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोर पुरुषांची जयंती की त्यांच्या विचारांची पुण्यतिथी?

"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" - तरुणांपुढील आवाहन

दुःख : एक भावना