एक वैतागलेला औरंगाबादकर

कधी काळी आशिया खंडातील सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहर आज निष्क्रिय नेत्यांमुळे आणि प्रशासनामुळे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये दिसत आहे. आज माझ्या औरंगाबाद शहराची ओळख धुळीने माखलेल शहर, खड्ड्यांच शहर, कचऱ्याने ग्रासलेल शहर, दंगलीमुळे वादग्रस्त झालेल शहर, अशा इत्यादी नकारात्मक गोष्टीमूळे नेहमी वादात राहणार शहर म्हणून ओळखला जात आहे. जे शहर भौगोलिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. ज्या शहरांमध्ये उद्योजकतेसाठी आणि प्रगतीसाठी खूप जास्त वाव आहे. जेथे अत्यंत प्राचीन अशा ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्राचीन वास्तु आहेत. जे शहर निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेलं आहे. ज्या शहराला पाण्यासाठी प्रचंड मोठे जयकवाडी धरण आहे. तसं पाहिलं तर या माझ्या शहराला भौगोलिक दृष्ट्या कोणतेही नैसर्गिक हानी नाही. या माझ्या शहराला अत्यंत मेहनती खेळाडू, कलावंत, लेखक, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्चर, इत्यादी क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणारे असे बहुगुणी नागरिक लाभलेले आहेत. जे या शहराचे नाव मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पण अशा बहुगुणी नागरि...